यमुनाष्टकम्

          श्री आद्य शंकराचार्यांनी रचलेले हे स्तोत्र म्हणजे यमुनेच्या अथांग पात्रातील भावभक्तिची एक नौकाच आहे. त्याचे प्रभावी शब्द यमुनेचा प्रवाहही उलटा फिरवून परत गोकुळाला घेऊन जातात. काळालाही मागे टाकत झुळझुळ वाहणारी ही कालिंदी परत आपल्याला घेऊन जाते त्या गोकुळात जिथे कृष्णलीला कधी संपतच नाही. कृष्ण आणि कालिंदीचं हे अतूट अलवार नातं आचार्यांनी आपल्या शब्दातून हळुवारपणे उलगडलं आहे.

 

मुरारिकायकालिमाललामवारिधारिणी

तृणीकृतत्रिविष्टपा त्रिलोकशोकहारिणी।

मनोऽनुकूलकूलकुञ्जपुञ्जधूतदुर्मदा

धुनोतु मे मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा

 

 ललाम – mçáboj, प्रिय,मनोहरओळ,मालारेखा  वारि – पाणी। त्रिविष्टप -  स्वर्ग  कूल – किनारातीर  

 

सलील सावळे जिचेच कृष्णरंगि रंगले

सुनीलवर्ण नीरवस्त्र चारुगात्रि वाहते

तृणासमान तुच्छ स्वर्ग भासतो जिच्यापुढे

करी सुखीच जी समस्त  लोक आपुल्या जले।।1.1

 

जिच्या तिरी तरू लता सुपुष्पिता सुगंधिता

 अहंपणा निवारुनी  मनास दे प्रसन्नता

उदासभाव खिन्नता धुवोनि टाकिते सदा

मनास तीच निर्मला करो कलिंदकन्यका।।1.2

 

 

 

मलापहारिवारिपूरभूरिमण्डिताऽमृता

भृशं प्रपातकप्रवञ्चनातिपण्डिताऽनिशम्।

सुनन्दनन्दनाङ्गसङ्गरागरञ्जिता हिता

धुनोतु मे मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा।। 2

 

जलौघ हा अफाट थोर अमृतासमा जिचा

अपाप जी करी जना असेचि मुक्तिदायका

महान पातकेहि खंड खंड होति लीलया

हितास वाहुनीच घेतले जिने जनाचिया ।।2.1

 

जिच्या जळीच खेळला मुकुंद मेघनीळ हा

सुनील कोमलातनू सवेचि गोपबालका

मुकुंद अंगसंग तोचि कृष्णकांति दे जिला

मनोमला धुवोच ती कलिंदकन्यका सदा ।।2.2

 

 

 

लसत्तरङ्गसङ्गधूतभूतजातपातका

नवीनमाधुरीधुरीणभक्तिजातचातका।

तटान्तवासदासहंससंवृता हि कामदा

धुनोतु मे मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा।।3

 

   लसत् – चमकणारेनाचणारे, धुरीण – मुख्यप्रधानअग्रणी  नवीनताजे

 

तरंग कांतिमान चंचला अतीव निर्मला

करी समस्त प्राणिमात्र पापमुक्त हे सदा

अवीट नीरमाधुरी असेचि अमृतापरी

तयावरीच भक्तश्रेष्ठ लुब्ध चातकापरी।।3.1

 

जमून भक्त हंस हे जिच्या तिरी निरंतरा

करी स्तुतीच गोड बोल गाउनी पुन्हा पुन्हा

असेल कामना मनी करीच जी पुरी सदा

मनोमला धुवो कलिंदपुत्रि तीच माझिया ।।3.2

 

 

 

विहार-रास-खेद-भेद-धीर-तीर-मारुता

गता निरामगोचरे यदीयनीरचारुता

प्रवाह-साहचर्यपूत-मेदिनी-नदी-नदा

धुनोतु मे मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा।।4

 

जिच्या तिरावरील मंद मंद वायु शीतला

विहार-रासनृत्य-शीण घालवी उदासता

सलील गोडवे जिचे वदू शके  वाणि  गा

विराम घेचि वैखरी सुचे  शब्द वर्णना।।4.1

 

जिचा प्रवाह निर्मला सुखी करी वसुंधरा

नदी-नद्या जिला मिळून हो पवित्र सौख्यदा

कृतार्थ होय सिंधुही करून प्राप्त ज्या जला

मनास तीच निर्मला करो कलिंदकन्यका ।।4.2

 

 

 तरङ्गसङ्गसैकताञ्चितान्तरा सदाऽसिता

शरन्निशाकरांशुमञ्जुमञ्जिरीसभाजिता।

भवार्चनाय चारुणाम्बुनाऽधुना विशारदा

धुनोतु मे मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा।।5

 

जिचे तरंग सुंदरा मनोहरी करी तटा

सुरम्य वालुकामयी प्रदेश भूषवी सदा

सुवर्ण वर्ण सावळा झळाळतो जिचा सदा

जिला बघूनि आठवे सदैव कृष्ण सावळा।।5.1

 

सुधांशुरश्मि चंद्रकांत स्पर्शिता जला हिच्या

फुलेच चांदण्यांचि माळिते हि स्वप्नसुंदरा

रुप्यात नाहतीच वृक्षमंजिरी जिच्या तिरा

सुशोभिता करी प्रवाह शारदीय रात्रिला।।5.2

 

अखंड मग्न तज्ञ सृष्टिपूजनीच जी सदा

अपार सौख्य देतसे समस्त जीवसृष्टिला

हरीस सौख्य द्यावया नसे कुणी जिच्यासमा

मनोमलास ती धुवो कलिंदकन्यका सदा ।।5.3

 

 

 

जलान्तकेलिकारिचारुराधिकाङ्गरागिणी

स्वभर्तुरन्यदुर्लभाङ्गसङ्गतांशभागिनी।

स्वदत्तसुप्तसप्तसिन्धुभेदनाऽतिकोविदा

धुनोतु मे मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा।।6

 

जिच्या जलात खेळलीच राधिका मनोहरा

तिच्याच अंगिच्या उटीत रंगलीच श्यामला

अतीव दुर्लभा असेचि कृष्णसंग जो जना

मिळेचि अंगसंग त्या मुरारिचा सदा जिला।।6.1

 

गभीर धीर सप्तसिंधुच्या जली प्रशांत ह्या

सवेग जी शिरूनि चंचला करी जलास त्या

असे प्रवीण भाग्यवान कृष्णकामिनी महा

मनास तीच निर्मला करो कलिंदकन्यका।।6.2

 

 

जलच्युताच्युताङ्गरागलम्पटालिशालिनी

विलोलराधिकाकचान्तचम्पकालिमालिनी।

सदावगाहनावतीर्णभर्तृभृत्यनारदा

धुनोतु मे मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा।।7

 

मुकुंद खेळता जळी उटी सुगंधि अंगिची

सुगंधिता करी प्रवाहलुब्ध भृंग त्यावरी

तशाच भाळुनी हरीवरीच गोपिका तिरी

सख्यास शोधता उरे  भानही तयां मुळी।।7.1

 

हरिप्रियाच गोपिकाअसोत धुंद भृंगही

करी मनोज्ञ सुंदरा नदीस त्या सुलक्षणी

हरीस भेटण्या अधीर राधिका फिरे तिरी

गळे तिच्याच वेणितून माळिली फुले जली।।7.2

 

जुई चमेली चंपकादि पुष्पमालिका  त्या

जलास भूषवी अखंड प्रीतिची अभंगता

स्वभर्तृभक्त नारदादि नाहती जळी जिच्या

मनास तीच निर्मला करो कलिंदकन्यका।।7.3

 

 

सदैव नन्दनन्दकेलिशालिकुञ्जमञ्जुला

तटोत्थफुल्लमल्लिकाकदम्बरेणुसोज्ज्वला।

जलावगाहिना नृणां भवाब्धिसिन्धुपारदा

धुनोतु मे मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा।।8

 

जिच्या तिरावरील दाट रम्य पर्णमंडपा

सुरम्य पुष्प वल्लरी करी सुशोभिता सदा

सवंगड्यांसवे तयात नंदलाल खेळला

सुरेल बासरीत चिंब जाहला प्रवाह हा।।8.1

 

कदंब डोलती सुखे प्रफुल्ल पुष्प वल्लरी

बहार मालतीस ये सुगंध खेळतो तिरी

पराग वाहती जळी तरंगती हवेवरी

नितांत रम्य मंत्रमुग्ध होय कृष्णकामिनी।।8.2

 

करून स्नान ज्या जळी मिळेचि मुक्ति मानवा

भवाब्धि घोर तारुनीच पैल पोचवी नरा

सुशोभिता सुमंगला सुनीलनीर-पावना

मनास तीच निर्मला करो कलिंदकन्यका।।8.3

 

 

-         - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

 

नंदन नाम संवत्सरवैशाख पौर्णिमा (बुद्ध जयंती 6 मे,2012

 

No comments:

Post a Comment