कबीर


(मात्रा -16,12)

                        साधो सहज समाधि भली।
गुरुप्रताप जहँ दिनसे जागी, दिन दिन अधिक चली।।1
जहँ जहँ डोलौ सो परिकरमा, जो कुछ करौं सो सेवा।
जब सोवौं तब करौं  दंडवत, पूझौ और न देवा।।2
कहों सो नाम,सुनौ सो सुमिरन, खावौ पिवौ सो पूजा।
गिरह उजाड एक सम लेखौं,भाव मिटावौं दूजा।।3
आँख न मूँदौ,कान न रूधौं, तनिक कष्ट नधारौ।
खुले नैन पहिचानो हँसि हँसि, संदर रूप नाहारौ।।4
सबद निंतर से मन लागा, मलिन वासना त्यागी।
ऊठत बैंठत कब हूँ न छूटै, ऐसी तारी लागी।।5
कह कबीर यह उनमिनि रहनी, सो परकट करि गाई।
दुख सुख से कोई परे परमपद, तेहि पद रहा समाई।।6

(मात्रा -16,12)

                      साधो, सुगम समाधि बरी!
गुरु करणीची जादु विलक्षण,  प्रतिदिन रंगत न्यारी।।
कळे न मज परि काय जाहले, येता त्याची प्रचिती
सज्जन मी हो कैसे सांगू, सुख अनुपम मी भोगी।।
डोले मी जे, परिक्रमा ती, बोलचि होय स्तुती
घडेल हातुन ती ती सेवा, झोप, दंडवत पायी।।
पूजा नुरली आता मजला, देव दुजा ना नयनी
शब्द शब्द जिव्हा बोले ते, राम नाम सुखदायी।।
ऐके कान चि जे जे ते ते, ‘सुमिरन सुमिरन’ मजसी
खातो पीतो  तीची  पूजा,  असे नित्य नेमाची।।
रम्य गिरी ओसाड रान वा, समान भासे दोन्ही
उरला नाही भेदभावची । मनात माझ्या काही।।
मिटणे डोळे, कानी बोळे,  कष्ट जरा ना लागे
रूप हरीचे सुंदर पाही, हसत हसत नयनाने।।
नाम एक ते बसले चित्ती , मलिन वासना गेली
उठतो बसतो परि ना उतरे, लागे अशी समाधी।।
कबीर बोले ‘उन्मनि’ हीची, प्रकट आज झाली
सुख दुःखाच्या पलीकडे त्या, ‘परमपदी’ मी राही।।

(सुमिरन - नाम-स्मरण)



-----------------------------------------------------


यदि अल्लाह केवल मस्जिद में ही रहता हैं, तो
बाकी सारा देश किसका है?
हिन्दु कहते हैँ कि भगवान मूर्ति में हैं,
मुझे दोनो में सत्य नहीं दिखता।
हे भगवन् तुम अल्ला हो या राम, मैं तुम्हारे नाम
से ही जीता हूँ, मुझ पर कृपा करो।
हरि दक्षिण में है, अल्लाह पश्चिमें।
हृदय में खोजो, तो हृदयके अन्तस्तल
में उनको विराजित पाओगे।

(वृत्त मंदाक्रांता, अक्षरे -17, गण म भ न त त ग, यति -4,6,7.)

राहे अल्ला मशिदित जरी, देश बाकी कुणाचा?
हिंदुंचाही हरि वसतसे, मूर्तिमध्ये चि कैसा?
दोन्हीमध्ये मज न दिसते, तथ्य ते अल्प काही
मूर्ती किंवा मशिदित कसा देव कोंडून राही?।।
देवा तूची रहिम असु दे, राम वा अन्य कोणी
उच्चारीतो मधुर तव हे, नाम रात्रंदिनी मी
झाला त्याने सकल मम हा ,जन्मची धन्य लोकी
देवा राहो मजवर तुझी, सत्कृपा नित्य ऐसी।।
राहे विष्णू कुणि म्हणतसे, दक्षिणेला चि नित्या
अल्ला राहे, मजसि न कळे पश्चिमेसीच का त्या?
कैसा देवा मज दश दिशा शोधुनी सापडेना

शोधा यासी हृदयकमळी, हा विराजीत झाला।।

------------------------------------------------

  साखी

मात्रा -  13 (8+5)     11(8+3)

शिष्य पूजै गुरु आपना, गुरु पूजे सब साध

कहैं कबीर गुरु शीष कोमत है अगम अगाध ।। 1 ।।

शिष्य-हृदी  गुरु-पाऊलेसंतपदी गुरु ठाम

म्हणे कबीर गुरुशिष्य हे नित्य अगम्य अगाध ।। 1 ।।

शिष्य अनन्य भावाने आपल्या गुरूचे पूजन करत असतो तर गुरू असे साधुसज्जनांना सर्वभावसमर्पित असे पूजित असतो. कबीर म्हणतात, गुरु शिष्यांचा संबंध अगम्य आणि आगाध आहे. जनसामाम्यांना तो कळणार नाही.

----------------------------------------------------

देश दिशांतर मैं फिरूंमानुष बडा सुकाल

जा देखे सुख उपजै, वाका पडा दुकाल ।। 2 ।।

देशोदेशी भटकता, भेटे जनसंभार

पाहुन ज्याला सुख मिळे, दुर्मिळ ऐसा नार ।। 2 ।।

मी देशोदेशी भ्रमण करून खूप जग पाहिले. माणसांची कुठेच कमी नव्हती. माणसांचा सुकाळच होता. दुष्काळ होता तो फक्त त्या सज्जनांचा, ज्यांना पाहून मनामधे सुख, शांती  आपोआप उत्पन्न होईल.

----------------------------------------------------

स्वामी सेवक होय केमन ही में मिलि जाय

चतुराई रीझै नहींरहिए मन के मांय ।। 3 ।।

स्वामी सेवक होऊनीमिलन मनांचे होत

तेथे मखलाशी नको, एक विचार सुबोध ।। 3 ।।

जसे पाणी पाण्यात मिसळून जावे तसे स्वामी आणि सेवकाचे मन एकमेकात मिळून गेलेले असावे. तेथे चतुराई, मखलाशी कामास येत नाही. चतुराई दाखवून कोणी कोणाला वश करू शकत नाही. तेथे मनोमिलनच व्हावे लागते.

----------------------------------------------------

गुरु कीजै जानि के, पानी पीजै छानि

 बिना बिचारे गुरु करे, परै चौरासी खानि ।। 4 ।।

प्यावे पाणी गाळुनी,   गुरु करणे जाणुन ज्ञान

विना विचार करता गुरू,  नित दुःखाची खाण ।। 4 ।।

----------------------------------------------------

गुरु तो ऐसा चाहिए, शिष सों कछु लेय

शिष तो ऐसा चाहिए, गुरु को सब कुछ देय ।। 5 ।।

 गुरू असावा असा भला , मागे अल्प मोल

शिष्य असावा असा भला सर्वस्व देइ मोल

 

----------------------------------------------------

गुरु भया नहिं शिष भया, हिरदे कपट जाव

आलो पालो दुख सहै,  चढि पाथर की नाव ।। 6 ।।

गुरु भला ना शिष्य भला असता कपट मनात

ऐल-पैल ना पोचवी  दुःखद दगडी नाव ।। 6

जोपर्यंत हृदयात कपट आहे, मनात मखलाशी आहे, पोटात काळेबेरे दडले आहे तोपर्यंत तो गुरू गुरू नाही आणि शिष्य शिष्य नाही. अशी परिस्थिती दोघांसाठीही दुःखद, विनाशाला कारण ठरते. जसे दगडी नावेत चढून (अज्ञान, मोह, मत्सर रूपी नावेत चढून ) ऐलतीर पैलतीर असा (भवसागराचा )कुठलाच तीर गाठता येत नाही.

----------------------------------------------------

ऐसा कोई ना मिलाजासू कहूं निसंक

जासो हिरदा की कहूं, सो फिर मारे डंक ।। 7 ।।

ज्याच्यापाशी हृदय हे उघडावे मी निःशंक

कोणी मज ना भेटला वर मारे मज डंख ।। 7 ।।

ज्याच्यापाशी निःशंकपणे आपलं मन मोकळं करावं असा आधार प्रत्येक माणूस शोधत असतो. माणूस आपलेपणाने ज्याला आपली व्यथा सांगावयास जातो तो ती हसण्यावारीतरी नेतो, त्याच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी त्याची उपेक्षा तरी करतो नाही तर त्या दुःखिताचा बरा भेद कळला म्हणून गैरफायदा घेऊन  त्यालाच अशी काही अद्दल घडवतो की त्याला कुठून  आपण आपले मन मोकळे केले असे वाटावे. म्हणून कबीरजी म्हणतात, कोणाजवळ मन मोकळ कराव असा मला एक माणूस सापडला नाही. सर्व जण सापासारखे डंख मारणारेच होते.

----------------------------------------------------

ऐसा कोई ना मिला, हम को दे उपदेश

भवसागर में डूबते , कर गहि काढे केश ।। 8

आजवरी नच भेटला, हित सांगे जो खास

केस धरुन काढे वरी, भवाब्धितुन बुडत्यास ।। 8 ।।

----------------------------------------------------

हिरदे ज्ञान उपजै, मन परतीत होय

ताको सद्गुरु कहा करे, घनघसि कुल्हर होय ।। 9

ज्ञानज्योत उजळे हृदि ,  परतत्त्व  स्पर्शे ज्यास

 त्यासी सद्गुरु काय करे, ढग घासुन कुर्हाड खास ।। 9 ।। 

----------------------------------------------------

जिन ढूंढ़ा तिन पाइयां, गहरै पानी पैठ

मैं बपुरा बूडन डरा, रहा किनारे बैठ ।। 10

तटी बसुन मोती मिळे , म्हणतो पाणी खोल

तटी बसुन मी बापुडा , बुडेन म्हणतो खोल

----------------------------------------------------